यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला आहे. शेतात पिढ्यानपिढ्या घाम गाळून रक्त आटवलं तरी ही, मुलाबाळांचे भविष्य उज्ज्वल करता आले नाही, ही खंत शेतकऱ्यांच्या मेंदूला डागण्या देत आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले आहेत. कर्जाचा बोजा, उत्पादन खर्च आणि सततची नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे आता यवतमाळमध्ये पुन्हा आत्महत्यांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.