नवी मुंबई: मोठी बातमी समोर येत आहे. एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मधील पाणी लाईन कापण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी पाणी लाईन कापल्याने माथाडीवर्ग आक्रमक झाला आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याकडून कांदा बटाटा मार्केट बंद करण्यात आलं आहे. सर्व माथाडी आणि मापाडी कामगारांसह मनपा मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं नरेंद्र पाटील म्हणाले. मार्केट मध्ये फिरून मार्केट बंद करण्यात येत असून मोर्चात सहभागी होण्याचे सर्व कामगारांना आवाहन करण्यात येत आहे. मनापा आयुक्तांची भेट घेऊन मार्केटचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे. जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही सानपाडा महामार्ग अडवणार असल्याचा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.