Varandha Ghat Saam TV
Video

Raigad Rain Update : वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद|VIDEO

Varandha Ghat : पावसाळ्यात संभाव्य अपघात आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन वरंध घाटावरील वाहतुक ३0 सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. ताम्हिणी घाटाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि लोकप्रिय असलेला वरंध घाट मार्ग आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरवर्षी पावसात या घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने आणि अपघातांचा धोका वाढत असल्यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही अधिसूचना जारी केली आहे.या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून ताम्हिणी घाटाचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे.

वरंध घाट हा खुप पुरातन मार्ग असून, रायगड, कोकण आणि पुणे यांना जोडणारा एक निसर्गरम्य आणि लहान अंतराचा मार्ग आहे. पण पावसाळ्यात या घाटात दगड-धोंडे पडणे, रस्ते निसरडे होणे आणि अपघात होणे हे प्रकार वारंवार घडत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

SCROLL FOR NEXT