ठाकरे सेनेच्या उमेदवाराला मशाल चिन्ह मिळालं नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला.  saam tv
Video

ठाकरे सेनेच्या उमेदवाराला मशाल चिन्ह नाही! कुठे घडला हा प्रकार?

shiv sena mashaal symbol controversy : महापालिका निवडणुकीत महायुतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यावर विरोधकांनी शंका उपस्थित केली असतानाच, आता छत्रपती संभाजीनगरात ठाकरे सेनेच्या उमेदवाराला मशाल चिन्ह मिळालेलं नाही. त्यामुळं अंबादास दानवे आक्रमक झाले.

डॉ. माधव सावरगावे

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता झडायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे मतदानाआधीच महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यावरून विरोधकांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. तसेच निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांसाठी काम करत असल्याचाही आरोप होत आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सावित्रीबाई हिरालाल वाणी या प्रभाग क्रमांक ४ मधून रिंगणात आहेत. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही निवडणूक निर्णय अधिकारी मशाल चिन्ह देत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात शिवसेना नेते अंबादास दानवे पोहोचले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी ते प्रचंड आक्रमक झाले होते.

याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारांना माघारीसाठी मंत्री धमकावत असल्याचा, तसेच काही अधिकारी सत्ताधाऱ्यांचे गुलाम असून, फोनाफोनी करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. सगळ्यांचे खातेपुस्तक आहे. हिशेब ठेवू. वेळ आल्यावर व्याजासकट परतफेड करू, असा इशाराही त्यांनी दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT