महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता झडायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे मतदानाआधीच महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यावरून विरोधकांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. तसेच निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांसाठी काम करत असल्याचाही आरोप होत आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सावित्रीबाई हिरालाल वाणी या प्रभाग क्रमांक ४ मधून रिंगणात आहेत. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही निवडणूक निर्णय अधिकारी मशाल चिन्ह देत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात शिवसेना नेते अंबादास दानवे पोहोचले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी ते प्रचंड आक्रमक झाले होते.
याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारांना माघारीसाठी मंत्री धमकावत असल्याचा, तसेच काही अधिकारी सत्ताधाऱ्यांचे गुलाम असून, फोनाफोनी करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. सगळ्यांचे खातेपुस्तक आहे. हिशेब ठेवू. वेळ आल्यावर व्याजासकट परतफेड करू, असा इशाराही त्यांनी दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.