सोलापूर: उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर आचरणात आणले, तर संपूर्ण जग सुखी होईल.
भारत-पाकिस्तान फाळणीबाबत बोलताना ते म्हणाले, फाळणी का झाली हे मला माहिती नाही. त्यावेळी अनेक निरपराध जीव गेले. कोण फाळणीस जबाबदार होतं याचा शोध घेणं गरजेचं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, बॉर्डरवर आपल्या घरातील कोणी गेलं तर काय वाटेल, याचा विचार करा. रणगाडे, प्लेन, मिसाईल दाखवण्यासाठी हे सगळं सुरू आहे का? दहशतवादावर बोलताना त्यांनी प्रश्न केला, दहशतवादी का तयार होतात? ज्याला दोन वेळचं अन्न मिळत नाही, तो काय करणार?
तसेच त्यांनी धर्माच्या मुद्द्यावर बोलताना सांगितलं, हॉस्पिटलमध्ये जाताना धर्म विचारत नाहीत, ब्लड ग्रुप विचारतात. हिंदू-मुस्लिम कोणही असो, सर्वांनी शांततेत जगावं. डोनाल्ड ट्रम्पच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, निसर्ग माणसाने निर्माण केलेला नाही. निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही. आपली भूमिका स्पष्ट करत उदयनराजे म्हणाले, माझं बोलणं कुणाला पटो अथवा न पटो, पण जे चुकीचं आहे त्यावर बोलणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिप्रेत नव्हतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.