राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर या दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अवमानकारक टीका केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापची लाट उसळली आहे. या सर्व प्रकरणावर भारतीय जनता पक्षाचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला.
शिवाजी महाराजांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून उदयनराजे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधिनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावे आणि तात्काळ कायदा बनवावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच हा कायदा झाला तर या पशा आणि राहुल्या अशा क्रियानिष्ट लोक धाडससुद्धा करणार नाही. कायदा नसल्यामुळे या लोकांना धाक राहिला नाहीये. सरकार कायदाच बनवत नाही म्हणून असे प्रकार वाढत आहे अशी आक्रमक टीका उदयन राजे भोसले यांनी आपल्याच सरकारवर केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.