मुंब्रा-दिवादरम्यान लोकलमधून ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ४ प्रवाशांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा लोकलमधील गर्दीचा विषय समोर आला आहे. प्रवाशांच्या मृत्यूंतर सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे नेते राजू पाटील यांनी लोकल गर्दीचा विषय अधोरेखित केला होता. त्यांनी बदलापुरातील गर्दीचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी लोकलच्या गर्दीचं वास्तव मांडलं आहे. मनसे राज पाटील यांनी ट्विट करत म्हटलं की, 'आपल्याकडे काही घडल्यावरच प्रशासनाला जाग येते. त्यानंतर ते अॅक्शन मोडमध्ये येतात. गर्दीच्या स्थानकांवर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात भयंकर दुर्घटना घडणार'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.