Team India Celebration at Wankhede in Mumbai SAAM TV
Video

VIDEO : सूर्याने तो कॅच नाही तर वर्ल्डकप पकडला; चाहत्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ बघून तो अविस्मरणीय क्षण डोळ्यांसमोर येणारच!

Team India Celebration in Mumbai : टीम इंडिया वर्ल्डकप विजयाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत आलीय. खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केलीय. मरीन ड्राइव्हवर निळा सागर दिसतोय. एका चाहत्यानं सूर्यकुमारनं फायनलमध्ये घेतलेल्या अप्रतिम झेलचा उल्लेख केला.

Nandkumar Joshi

Team India Celebration : टीम इंडियानं १७ वर्षांनंतर टी २० वर्ल्डकप जिंकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघानं विजय मिळवून अवघ्या देशाला गिफ्ट दिलं. या अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवनं सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला. त्यामुळं सामना फिरला. सूर्यकुमारनं घेतलेला हा झेल अविस्मरणीय आहे. जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेटचा इतिहास सांगितला जाईल, तेव्हा सूर्यकुमारने घेतलेल्या झेलचा उल्लेख होईल. आता टीम इंडिया वर्ल्डकप घेऊन मुंबईत आली आहे. मुंबईत खेळाडूंची ओपन बसमधून परेड होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. रस्ते खचाखच भरलेले आहेत. आपल्या चॅम्पियन्सला भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. सूर्यकुमारने तो झेल नाही, वर्ल्डकपच पकडला होता. तो कॅच नाही तर मॅच होती, अशी प्रतिक्रिया एका चाहत्यानं दिलीय. याशिवाय मैदानात आणि मैदानाबाहेर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT