राज्यातल्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने शालार्थ प्रणालीतील ॉ शिक्षक आणि शिक्षकेतवर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रोसेस पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात केले आहे. तुम्ही जर ई-केवायसीची प्रोसेस पूर्ण करणे टाळले तर ऑगस्ट महिन्याचे वेतन रोखण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबींकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
तसेच अर्थ खात्याच्या २८ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत शालार्थ प्रणालीतील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र, अजून अनेक कर्मचाऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे आता कठोर भूमिका घेण्यात आली आहे. तर यामध्ये यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हा आदेश अनुदानित शाळा, खासगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शालार्थ प्रणालीतून वेतन घेणारे सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.