शरद पवार आणि अजित पवार यांच्यात तासभर चर्चा, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व saam tv
Video

Maharashtra Politics : शरद पवार - अजित पवार यांची भेट, तासभर चर्चेत नेमकं काय झालं? | VIDEO

Sharad Pawar-Ajit Pawar Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची घडामोड आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली असून, त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळं राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

Nandkumar Joshi

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला. या भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट दोन निवडणुकांमध्ये आमनेसामने आले. मागील काही दिवसांत विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या. आता पुन्हा राजकीय नेत्यांच्या आणि विश्लेषकांच्या भुवया उंचावणारी राजकीय घटना घडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार या दोन नेत्यांची भेट झाली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. वायबी सेंटरमध्ये हे दोन्ही नेते भेटले. त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. प्राथमिक वृत्तानुसार, माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी ही भेट झाल्याने महत्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT