संजय राऊत यांचं ऐकण्यामुळे आज उबाठाची ही अवस्था झाली आहे, असा टोला शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी लगावला आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना अडीच वर्षांपूर्वी सांगितलं होतं की राऊतांचं ऐकु नका. त्यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडी तयार करू नका. मात्र आज उबाठाची अवस्था ही राऊत यांच्यामुळेच अशी झाली आहे, असंही यावेळी बोलताना देसाई यांनी म्हंटलं.
पुढे बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, संजय राऊत यांनी आमच्याकडे पाहण्याची गरज नाही, त्यांनी उबाठाकडे पाहावं, त्यांची काय अवस्था झाली याकडे लक्ष द्यायला हवं. जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिलं आहे. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आभार मानतो. आज देवेंद्रजी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. शिवसेना आमदारांनी वर्षा बंगल्यावर भेटून साहेबांनी शपथ घ्यावी, हा आग्रह धरला. आज पुन्हा आम्ही जाणार आहोत. आमचा हक्क आहे, आमच्या नेत्याकडे आग्रह करायचा.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.