अहमदनगरमधील दारणा धरण क्षेत्रात संततधार सुरु असल्यामुळे हे धरण 80 टक्क्याहून अधिक भरले आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आणि गोदावरी नदी दुथडी भरुन वाहू लागली. कोपरगाव तालुक्यातील शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे तरुण भावंडं नदीतील मोटारी काढण्यासाठी गोदावरी पात्रात उतरले. नदी पात्रातील पाणी वाढल्याने तिन्ही तरुण वाहत गेले.तरुण गोदावरी नदी पात्रात बुडत असताना परिसरात शेळ्या चारणाऱ्या ताराबाई नामक महिलेने प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि दोघांचे प्राण वाचवले आहेत. ताराबाईने दाखवलेल्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र या घटनेत दुर्दैवाने एका तरुणाला वाचवण्यात अपयश आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.