Sanjay Raut saam Tv
Video

Politics: संजय राऊतांचा 'जय महाराष्ट्र' नेमकं कुणाला? मोदी, शहा आणि फडणवीसांना केलं टॅग; पत्रकार परिषदेत सांगितलं कारण

Sanjay Raut tweet: हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी मोर्चा रद्द करून विजयी मेळाव्याची घोषणा केली. दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या ट्विटबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Bhagyashree Kamble

राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चा रद्द केला. पण मराठी माणसाचा विजय म्हणत विजयी मेळावा घेणार असल्याचं ठाकरे बंधूंनी जाहीर केलं. वरळीतील डोम सभागृहात हा विजयी सोहळा पार पडणार आहे.

दरम्यान, नुकतंच संजय राऊत यांनी केलेलं ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. दरम्यान, राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ट्विटमागील अर्थ सांगितला आहे.

संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच ट्विटबद्दल माहिती दिली. 'त्रिभाषा सुत्राचा जीआर फडणवीस सरकारने रद्द केला. हा विजय या महाराष्ट्र दृष्टांवरचा विजय प्राप्त आहे, यामुळे त्यांना जय महाराष्ट्र केलं', असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT