ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यातील पार पडलेल्या आणि होऊ घातलेल्या निवडणुकीवर भाष्य करत ठाकरे बंधूंची युतीची घोषणे संदर्भात माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, दोन भावांच्या युतीचे मनोमिलन झाले आहे.
मुंबईसह इतर शहरातील चर्चा अंतिम टप्यात आहे. शेवट पर्यंत यादीवर हात फिरवला जाईल. त्याआधीच शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा वाजत-गाजत अतिशय धुमधड्याकात केली जाणार असल्याचे राऊत म्हणाले. मुहूर्त काही काढला नाहीये. हा एक नवीन प्रयोग आहे. आमचे पक्ष एकत्रित निवडणूक लढत आहे.
या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक चर्चा पूर्ण केली. हे नाटक नाही तर प्रीतिसंगम आहे. महाराष्ट्राची जनता प्रीतीसंगममध्ये सहभागी होईल. कालचा लागलेला महाराष्ट्राचा निकाल कसा लागला हे जनतेला माहिती आहे. कोट्यवधी पैसे कसे दिले गेले. या निवडणुकीत जुंपली कोणामध्ये? तिघांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली.पैसे पकडले गेले. हर्षवर्धन सपकाळ जे म्हणता खरं आहे. निवडणूक आयोगानं त्यांना मदत केलीय. असे म्हणत त्यांनी महायुतीवर तोफ डागली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.