विरोधी पक्षाचा शनिवारी सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये पार पडला. या मोर्चामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. तसेच यावरच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील बोगस मतदार यादीवर भाष्य करत दुबार नावे जी आहे. ती काढण्याची मागणी केली आहे. संजय गायकवाड म्हणाले, मी जी मागणी केली आहे. की मतदार यादीत दुबार नावे आणि मृत्यू झालेली नाव आहे. त्यांच्या नावावर बोगस मतदान केले जाते. जी नावं डबल आहे. ती नावं काँग्रेसच्या काळातील आहे. आणि ती नावं काँग्रेसला मतदान करते आहे. पण ही नावं निवडणूक आयोग का काढत नाही, असा प्रश्न माझा आहे. निवडणूक आयोग का नावं काढत नाही. का विरोधी पक्षाला आरोप करण्यासाठी संधी देतो.असे संजय गायकवाड म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.