सरकारने महिलांना मोफत शिक्षण योजना राबवली आहे. पण यातील अटीमुळे १४ लाख मुलींना मोफत शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे. रोहित पवार यांनी या घटनेची दखल घेत सरकारवर टीका केली आहे. सरकारने ही योजना घाईघाईत घेतली आहे असे पवार म्हणाले. तसेच या योजनेत कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थिनींना वगळण्यात आले आहे. अनेक कुटुंबाना पाच ते दहा हजार रुपये फी सुद्धा भरता येत नाही असेही पवार म्हणाले. तसेच पावसात पोलिस भरती घेणार नाही असे सरकारने जाहीर केले होते. पण काही ठिकाणी भर पावसात भरती सुरू असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. चिखलात परीक्षा दिल्याने त्यांचा परफॉर्मन्स चांगला होत नाही असेही पवार म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.