Ratnagiri Saam TV
Video

Ratnagiri Heavy Rainfall : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर, 15 दिवसांत दीड कोटींचं नुकसान|VIDEO

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसल्यामुळे, घरांचे, रस्त्यांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे गेल्या 15 दिवसांत जवळपास दिड कोटीचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अनेक भागात दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तींमुळे १३० कच्च्या आणि पक्क्या घरांचे अंदाजे ४४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचे एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एकूण मिळून जिल्ह्याचे नुकसान दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पावसात पाण्यात बुडून आणि वीज पडून दोघांचा मृत्यू झाला असून, संरक्षक भिंत कोसळून आणि इतर घटनांमध्ये पाच जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

SCROLL FOR NEXT