पुणे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर आता शुल्क आकारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पावसाळ्यात पुण्यातील धबधबे, घाट, किल्ले आणि धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात. या गर्दीत अनेकजण सुरक्षेचे नियम पाळत नाहीत, हुल्लडबाजी करतात आणि त्यामुळे अपघात किंवा जीवितहानी होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नव्या धोरणांतर्गत शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या धोरणाचा उद्देश फक्त आर्थिक लाभ नसून, व्यवस्थापन, सुरक्षेची दक्षता आणि पर्यटनस्थळांचे संवर्धन हे मुख्य हेतू आहेत. याशिवाय, काही ठिकाणी निर्बंधात्मक आदेश लागू करण्यात येणार असून, धोकादायक भागांमध्ये प्रवेशावर मर्यादा ठेवली जाईल. जिल्हा प्रशासनाने पर्यटकांनी सहकार्य करावे, नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित पर्यटनाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.