India counter-terrorism response saam tv
Video

India Pakistan Tension: पाकचा नवा डाव, या देशातून घुसघोरीचा प्रयत्न; भारत अलर्ट मोडवर|VIDEO

Pahalgam terror attack: पाकिस्तानने तिसऱ्या देशांच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्याचा नवा डाव आखला आहे, ज्यामुळे दक्षिण आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत 26 भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या हल्ल्याने एकीकडे देशवासीयांचे मन सुन्न झाले तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या प्रति सगळ्यांचेच रक्त खवळले आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. तसेच दहशतवादी जिथे असतील तेथे एकेकाला गाडून टाकू असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.

तसेच हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताने पाकिस्तानच्या विरोधात कायदेशीर स्ट्राइक करत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. यामध्ये पाकिस्तानकडून आयात केला जाणार सर्व मालावर बंदी घातली आहे. यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहे.

मालाच्या आयातीवर बंदी घातल्याने पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या चांगलाच फटका बसला आहे. आता पाकिस्तान आपला माल खपवण्यासाठी नवीन शक्कल लढवत असल्याचे कळत आहे. तिसऱ्या देशाद्वारे तब्बल 4 हजार कोटींचा माल पाकिस्तान हा भारताला पाठवत असल्याचे गुप्तचर यंत्रणांना समजले आहे. मात्र, पाकिस्तानचा हा डाव देखील भारत हाणून पाडणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT