जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यामध्ये 26 निर्दोष पर्यटकांचा जीव गेला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाच सावट आहे. त्यानंतर गृह मंत्रालयाने बैठकीचे सत्र चालवत सिविल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्याची सर्व राज्यांना दिली होती. या पार्श्वभूमीवर आज सर्व राज्यामध्ये मॉक ड्रिल पार पडले असून यामध्ये नागरिकांना युद्धजन्य परिस्थितिमध्ये कशा उपाययोजना करायच्या याची प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच देशातील सर्व राज्यामध्ये महवाच्या आणि संवेदनशील ठिकाणी ब्लॅक आउट करण्यात आले. या मॉकड्रिलला आणि ब्लॅक आउटला देशवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करत पाकिस्तानचा बदला घेतला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी संघटनांचे तळ हे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.