उद्धव ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे आता कॉंग्रेस देखील स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आलेला दिसत आहे. तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट देखील स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी स्वबळाचा नारा देत असल्याचं बघायला मिळत असून आघाडी सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत वादंग झाले. विशेषत: कॉंग्रेस आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेल्याने आता या दोन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा देताना दिसत आहे. त्यामुळे मविआ फुटीच्या उंबरठ्यावर उभी असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या फुटीला कॉंग्रेस आणि ठाकरे गटातील वाद, मनमानी, मतभेद कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुढची राजकीय गणितं नेमकी कशी असणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By Rakhi Rajput
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.