मुंबई : पावसाळ्याच्या पहिल्याच सरींनी मुंबई मेट्रोच्या भुयारी स्थानकांची पोलखोल केली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा पावसामुळे छतामधून पाणीगळती झाली आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई मेट्रोच्या स्थानकात छतामधून पाण्याच्या धारा सुरू झाल्याने मेट्रो प्रशासनाला बादल्या ठेवून पाणी साठवावं लागत आहे. प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मेट्रोच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी देखील पावसाचं पाणी थेट स्थानकात शिरल्यामुळे प्रवाशांना चिखलातून वाट काढावी लागली होती. काही ठिकाणी पाण्याचा लोंढा एवढा होता की, मेट्रोमधून उतरल्यावर प्रवाशांना जणू तळ्यात उतरल्याचा अनुभव आला.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची परीक्षा होतेच, पण यंदा नव्याने उभारलेली आणि आधुनिकतेचा दावा करणारी भुयारी मेट्रोही अपयशी ठरल्याचं चित्र आहे. नागरिकांमध्ये नाराजी असून, मेट्रो प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती आणि उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
मोठा गाजावाजा करत या अॅक्वा लाइनचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात या अॅक्वा लाइनला नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.