मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः घाटकोपर पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाजवळील परिसरात नदीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत.
नाहूर, मुलुंड, भांडुप आणि कोळीवाडा या भागांमध्येही जोरदार पावसामुळे सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक वाहनं पाण्यात अडकली असून, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.अंधेरी सबवे परिसरात तर तब्बल ३ फूटांपर्यंत पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा पूर्णतः ठप्प झाला आहे. या भागात दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी रांग लागली आहे. हवामान विभागाने मुंबईला येलो अलर्ट दिला असून,काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.