मुंबईत सलग काही दिवस पडलेल्या पावसाला सध्या विश्रांती मिळाल्याने शहरात उकाड्याने पुन्हा डोकं वर काढलं आहे. हवामानातील अचानक बदलामुळे मुंबईकर त्रस्त झाले असून, उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र जाणवू लागला आहे. सध्या मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे, तर आद्रता टक्केवारीही वाढली आहे, ज्यामुळे अंगातून घामाचा धाराच सुरू आहे.
मुंबईसारख्या सागरी किनाऱ्यावरील शहरामध्ये दमट हवामानामुळे उकाडा अधिक असह्य होतो. अशा परिस्थितीत उष्माघात ,डिहायड्रेशन ,अशक्तपणा, चक्कर येणे, ताप आणि खोकला अशा लक्षणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी डॉक्टरांनी योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हाथ स्वच्छ धुणे, पुरेशी झोप घेणे आणि पोषक आहार घेणे.तसेच सहव्याधी असणाऱ्यांनी घरगुती उपाय न करता डॉक्टरांकडे जावे.
शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचं प्रमाण जरी पूर्ववत असलं, तरी अनेक ठिकाणी नागरिक तोंडाला रूमाल बांधून किंवा मास्क लावून फिरत आहेत, टोपी घालून किंवा छत्री घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहेत. मुंबईकरांनी सध्या परिस्थितीची गंभीरता ओळखून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. हवामान बदलाच्या या टोकाच्या चढ-उतारांमध्ये आरोग्याची काळजी घेण ही गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.