जेव्हा आपण वेगळेपणावर भर देतो, तेव्हा समाजात दुरावा निर्माण होतो. पण जर आपण एकतेच्या सूत्राने जोडले गेलो, तर आपलेपणाची भावना वाढते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. संपूर्ण जगामध्ये केवळ एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता. हाच खरा हिंदू धर्म आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली. पर्यटकांवर गोळीबार झाल्याची घटना दु:खद आहे. आपण सर्व एक असलो, तर कोणाची हिंमत होणार नाही आपल्या दिशेने वाकडं पाहण्याची, असे ते म्हणाले.
मोहन भागवत पुढे म्हणाले, ही लढाई धर्म आणि अधर्म यामधली आहे. काल धर्म विचारून मारलं. हिंदू धर्मात असे काही करणे शक्य नाही. आमच्या मनात दु:ख आहे, पण त्याचबरोबर क्रोधही आहे. जेव्हा असुरांचे निर्दालन करायचे असेल, तेव्हा अष्टभुजांची शक्ती आवश्यक असते. रावणाचे मन आणि बुद्धी बदलण्याची तयारी नव्हती, म्हणून रामाने त्याचा वध केला. दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.