दिल्लीत केंद्र सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत दिल्ली स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची घोषणा करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मृतांच्या नातेवाकईकांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली. देशात राष्ट्रविरोधी घटकांचं षडयंत्र असल्याची चर्चा मंत्रिमंडळात झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, '१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाद्वारे देशविरोधी शक्तींनी केलेल्या भ्याड दहशतवादी कृत्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.