माजी सरपंच संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली आहे, त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. एवढाच आमचा सध्या उद्देश्य आहे, असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. आज कॅबिनेटच्या बैठकीनंतर त्यांनी मंत्रालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड यांच्यावर भाष्य केलं.
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, या प्रकरणी मी राजीनामा देण्याची मागणी होत आहे. पण माझा या प्रकरणात कोणताही संबंध नाही, त्यामुळे मी का राजीनामा देऊ. या प्रकरणावर चौकशीसाठी आम्ही एसआयटी स्थापन केली आहे. सीआयडीकडून देखील तपास योग्य प्रकारे सुरू आहे. दिवंगत संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी एवढंच सध्या आमच्यासाठी महत्वाचं आहे, असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.