धाराशिव: धाराशिवमध्ये मनोज जरांगेंची जनजागृती रॅली आज आली आहे.हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या रॅलीत सहभागी झालेत. जरांगेंच्या रॅलीचा आजचा 5 दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला विरोधकांनी गैरहजेरी लावली.त्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून विरोधक आणि सत्ताधारी एकत्र येत नाहीत,असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी साम टिव्हीशी बोलताना सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर केला आहे. सरकार-विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. असं देखील जरांगे यावेळी म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.