maratha aarakshan मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मुंबईमध्ये भगवं वादळ धडकलेय. मुंबईच्या रस्त्यावर मराठे आक्रमक झाल्यानंतर कोर्टात जनहित याचिका दाखल कऱण्यात आली होती. सुनावणीवेळी कोर्टाने आज दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना संयम पाळण्याचे आदेश दिले. त्याशिवाय मैदानात गाड्या पार्क करण्याचे आवाहन केले.
मुंबई हायकोर्ट आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मराठा आंदोलकांनी त्यांचे टेम्पो, गाड्या मैदानात लावायला सुरुवात केली आहे. तसंच आंदोलकांना मैदानातच झोपण्याचे आदेश जरांगेंनी दिले आहेत. दरम्यान, दिवसभरामध्ये आझाद मैदानामध्ये हजेरी लावल्यानंतर क्षणभर विश्रांती करण्यासाठी अटल सेतू येथील ब्रिज गार्डनचा उपयोग आंदोलनकर्त्यांनी उपयोग केलेला आहे. तसेच ब्रिजच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.