मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कल्याणमधील तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी त्यांनी परप्रांतीयांच्या दादागिरीवर टीका केली, तर पुणे जमीन घोटाळ्यावरून सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही, आमच्या पक्षाचा निर्णय सन्माननीय राज ठाकरे घेतात असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून सरकारवर टीका केली आणि 'बूंद से गईं सो हौद से नहीं आती, या म्हणीचा वापर करत सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना मान देण्याच्या जीआरवर बोलताना, मान जबरदस्तीने मिळवता येत नाही, तो लोकांच्या मनात तयार व्हावा लागतो, असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.