लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या महिलांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. राज्य सरकारनं जवळपास 80 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केलेत. त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावं लागणारेय. त्यांना मोठा फटका बसलाय. तर दुसरीकडे गेल्या सप्टेंबरपासून अर्ज नोंदणीचं पोर्टलही बंद करण्यात आलंय. त्यामुळे सरकारविरोधात आता महिलांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय.
यावर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गरज सरो वैद्य मरो ही सरकारची भूमिका आहे. लाडक्या बहीणींना दीड हजारवरून 2100 रुपये देणार अशी घोषणा करुन मतांचा डल्ला मारणार जे सरकार आहे त्या सरकारने पैसे तर वाढवलेच नाही मात्र ज्यांना काही हफ्ते मिळाले त्यातही मोठ्या संख्येवर लाडक्या बहीणींची संख्या कमी केली आणि त्यामध्ये आता नव्याने कोणाचाही समावेश करत नाही. लवकरच ही योजना बंद होणार असल्याचा दावाही सपकाळ यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.