Farmer SAAM TV
Video

Maharashtra Farmers : ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मिळणार नुकसान भरपाई | VIDEO

33 Districts Maharashtra Help : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई जमा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जमा होणार आहे. एकूण २१ लाख शेतकऱ्यांना १,३५६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला होता, ज्यामुळे तब्बल ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बीड, सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यांना विशेषतः पुराचा फटका बसला होता. सर्व जिल्ह्यांचे पंचनामे शासनाकडे सादर झाल्यानंतर ही मदत मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT