Maharashtra Bans Analog and Artificial Paneer : महाराष्ट्रात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बनावट पनीरविरोधात राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात आता एनालॉग (Analog) आणि आर्टिफिशिअल (कृत्रिम) पनीरवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) जारी करण्यात आला आहे.
ही बंदी पुढील १ वर्षाच्या कालावधीसाठी लागू असणार आहे. या काळात राज्यात अशा प्रकारच्या कृत्रिम किंवा बनावट पनीरचे उत्पादन करणे, साठवणूक करणे, वितरण करणे किंवा विक्री करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा मानला जाईल. असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
वनस्पती तेल, स्टार्च आणि रसायनांचा वापर करून तयार केले जाणारे हे कृत्रिम पनीर आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. आमदारांनी विधानसभेत या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधत अशा बनावट पनीरवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली होती. प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घेत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.