कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज पुण्यात 'सकाळ अॅग्रोवन'च्या तिसऱ्या राज्यस्तरीय शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषदेचे उद्घाटन झालं. या मंथनात राज्यातील निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून त्यांच्या व्यावसायवृद्धीसाठी कॉर्पोरेट आणि पॉलिसी स्तरावर स्पष्ट दिशा देण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान भरणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कर्जमाफीसंदर्भात एप्रिल महिन्याच्या आत कमिटी अहवाल देईल आणि 30 जूनपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणाही केली.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीने आपल्या घोषणपत्रामध्ये शेतकऱ्यांचा सातबोरा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन वर्ष झाले तरी देखील कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांनी अनेकवेळा संताप व्यक्त केला होता. आता यावरच कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी लवकरच कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.