आगामी विधानसभा निवडणूकीत बच्चू कडू तिसरी आघाडी काढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी, मजुर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. सरकारने सकारात्मकता दाखवली तर ठीक नाहीतर येत्या निवडणुकीत आम्ही 15 ते 20 आमदार लढवणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले. तिसऱ्या आघाडीबद्दल मी बोलणार नाही, मी स्वतःचा निर्णय घेईन असं बच्चू कडू म्हणाले. जर आमच्या मागणीवर सरकारने सकारात्मक भुमिका घेतली नाही तर स्वतंत्र लढण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.