पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नवी दिल्ली येथे सरकारद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलण्यात आली होती. ही बैठक थोड्यावेळपूर्वी संपन्न झाली यानंतर या बैठकीत काय घडलं या सर्वची माहिती केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी दिली. राष्ट्रीय एकात्मता आणि दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्स पॉलिसी संदर्भातील सरकारची भूमिका सर्वपक्षीय बैठकीत मांडण्यात आली. या बैठकीत सर्व पक्षाचे नेते काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे देखील उपस्थित होते.
किरण रिजिजू बैठकीनंतर माहिती देताना म्हणाले, काही वर्षांपासून काश्मीरमध्ये शांततेत लोक व्यापार करत होते ,पर्यटक येत होते. सर्व चांगलं सुरू होतं या घटनेमुळे वातावरण बिघडले आहे. यावर सर्वांनी चिंता व्यक्त केली. आमच्या अधिकाऱ्यांकडून आयबी आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून ब्रिफिंग करण्यात आलं. घटना कशी झाली? चूक कुठे झाली? हे सांगितलं ज्या ठिकाणी घटना झाली ती जागा मुख्य रस्त्यावर नाही पायी जावं लागतं घोड्यावरून जावं लागतं दोन अडीच तास दूर ठिकाण आहे. तेथे ही घटना घडली सर्व पक्षांना सांगितलं की सर्व चांगलं सुरू असताना ही घटना घडली. ही एक चूक झाली सर्वजण दुखी आहेत. यापुढे अशा घटना होऊ नये या संदर्भातील ब्रिफींग करण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.