पुढील २४ तासांत पालघर वगळता संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे संपूर्ण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पावसाची तीव्रता लक्षात घेता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोरदार वाऱ्यांसह समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून, किनारपट्टी भागातील नागरिकांनीही सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांचाही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.