Long queues of worried depositors outside Solapur’s Samarth Cooperative Bank after RBI imposed restrictions; farmers express anguish as funds remain blocked amid heavy crop losses. Saam Tv
Video

अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त, ऊसाचे पैसेही अडकले; RBI निर्बंधांमुळे बळीराजा हवालदिल | VIDEO

Farmers In Solapur Unable To Withdraw Money: सोलापुरात अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाली असून, समर्थ सहकारी बँकेवर RBI निर्बंध आल्याने शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत.

Omkar Sonawane

सोलापूर: ऐन दिवाळीच्या तोंडावर सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) निर्बंध आणल्यानंतर ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. या निर्णयाची माहिती मिळताच पैसे काढण्यासाठी ठेवीदारांनी थेट बँकेत धाव घेतली. मात्र, निर्बंधांमुळे सध्या कोणतेही पैसे काढता येणार नाहीत, असे उत्तर बँक कर्मचाऱ्यांकडून दिलं जात असल्याने ठेवीदारांमध्ये धास्तावले आहे. बँकेसमोर महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक ठेवीदारांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे शेती वाहून गेलीय, मागच्या वर्षीच्या उसाचे पैसे नुकतेच जमा झाले होते, पण आता तेच पैसे बँकेत अडकले, अशी भावना एक शेतकरी व्यक्त करताना दिसला. अनेक ठेवीदारांना रुग्णालयातील खर्च, मुलांच्या शिक्षणाचे पैसे, वैयक्तिक गरजा अशा कारणांसाठी पैसे हवे आहेत. पण अचानक आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच जण हतबल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये आज प्रवेश करणार

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

SCROLL FOR NEXT