धाराशिव जिल्ह्यात बॅंकांकडून शेतकऱ्यांची कोंडी केली जात असल्याचं समोर आलं आहे. पीककर्जाची वसुली करण्यासाठी बॅंकांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील अणदुर, कळंब सह हजारो शेतकऱ्यांची बॅंक खाती बॅंकेकडुन होल्ड करुन शेतकऱ्यांची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन मशागत आणि फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांमोर मोठ संकट उभ ठाकलं आहे. मागील तीन वर्षापासून अतिवृष्टी,अवर्षण,नापीकी व रोगराईमुळे संकटात सापडलेला शेतकरी पिककर्ज भरु शकले नाहीत त्यातच बॅंकेकडुन खाती होल्ड केल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. खरीप पेरणीसाठी पैसे बचत करुन ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड केल्याने कोंडी झाली आहे. त्यामुळे बॅंकांनी होल्ड तातडीने काढावे अन्यथा बॅंकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.