Imtiyaz jalil News SaamTv
Video

Tiranga Rally : इम्तियाज जलील यांची मुंबईकडे कूच

Saam Tv

राज्यात जातीयवादाने मोठ्या प्रमाणात वातावरण खराब केले जात आहे. अनेक नेते दुसऱ्या धर्माच्या विरोधात तणाव निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. सरकार दुर्लक्ष करतच आहेच शिवाय त्याला खतपाणी घालत आहे, असं वक्तव्य एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे. एकाच प्रकरणात 50 एफआयआर दाखल केल्यानंतरही कुठलीही कारवाई होत नाही. न्यायालय देखील त्याची दखल घेत नाही. त्यामुळे राज्यात वाढणारा हा जातीयवाद थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत देण्यासाठी आम्ही मुंबईला जात असल्याचं देखील जलील यांनी म्हंटलं आहे.

एमआयएमच्यावतीने मुंबईपर्यंत निघालेल्या मोर्चाला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि मराठवाड्यातील शेकडो गाड्या या मुंबईला निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. थोड्याच वेळात ही रॅली मुंबईत पोहोचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांची रांग पाहायला मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT