समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. आझमींनी औरंगजेबाला कुशल प्रशासक म्हणून संबोधले होते. या वक्तव्यावर सरकार आक्रमक झालं असून, त्यांचे निलंबन आणि त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. अबु आझमींनी स्पष्टीकरण आणि हे वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले असले तरी, सत्ताधारी अद्याप आक्रमक पवित्र्यात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या काळात माता-भगिनींवर अत्याचार झाले. सर्वसामान्य जनतेचा छळ केला गेला, अनेक मंदिरं तोडली. असा औरंगजेब कुशल प्रशासक कसा होऊ शकतो? त्याचे गुणगाण करणाऱ्या अबु आझमींचा धिक्कार करतो, असे शिंदे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा हे आपले दैवत आहेत. त्यांचा अवमान करणे हा राष्ट्रद्रोह आहे. काल देखील या प्रकरणात काही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आजही सभागृहात सांगितले आहे. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर कठोर आणि निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारचं मत सगळ्यांचं आहे. आझमींचे वक्तव्य निंदाजनक आहे, असेही शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.