मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर आता एक विषय मोठ्या चर्चेत आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असे वाटत असतानाच आता धनगर आणि धनगड समाज हा एकच आहे, असे धनगड समाजाचे म्हणणे असून हा फक्त शब्दांचा फेरबदल झाला असल्यामुळे आम्ही आरक्षणापासून वंचित आहे अशी खंत धनगड समाजाने व्यक्त केलीय. खरं तर ही भानगड अनेक वर्षांपासून सुरू आहे.
आता हा मुद्दा थेट पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विठ्ठल आदित्य यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत धनगर आणि धनगड ही फक्त स्पेलिंग मिस्टेक झाल्यामुळे धनगर समाज हा आरक्षणापासून वंचित झाला आहे. धनगड समाज हा पहिल्यापासून अनुसूचित जमातीमध्ये आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा जेणेकरून धनगर समाजाचा बॅकलॅाग भरून निघेल. स्पेलिंग मिस्टेक दूर करण्याचा संपूर्ण अधिकार हा लोकसभेला आहे. सरकारने अधिवेशनाच्या माध्यमातून हा विषय सोडवावा आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने हा प्रलंबित प्रश्न संपवून टाकावा आणि राज्यातील धनगरांना न्याय द्यावा अशी मागणी या पत्राद्वारे वकील विठ्ठल आदित्य यांनी केली आहे.
हा राज्यातील धनगर समाजाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात जाऊन पोहोचला आहे. आता हा प्रश्न कधीपर्यंत सुटतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.