Crop Insurance Fraud SaamTv
Video

Crop Insurance : पिकविमा गैरव्यवहार; ४ लाख ५ हजार बनावट अर्ज रद्द होणार | VIDEO

Fraud In Crop Insurance : बोगस पिकविमा दाखल करण्यात आलेल्या ४ लाख अर्जासह महा ईसेवा केंद्रांवर कारवाई होणार आहे. यातले सर्वाधिक अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातील असल्याचं उघडकीस आलं आहे.

Saam Tv

राज्यात चर्चेत असलेल्या पिकविमा गैरव्यवहाराबाबत आता कारवाईचा धडाका सुरू झाला आहे.

खरीप हंगामात झालेल्या पिकविमा गैरव्यवहाराबाबत अनेक दिवसांपासून आरोप केले जात असतानाच आता याबद्दल अखेर कृषी विभागाने कारवाईचे आदेश जारी केलेले बघायला मिळत आहे. पिकविम्यासाठी गेल्या वर्षी खरीपाच्या हंगामात दखल झालेले ४ लाख ५ हजार बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यातले १ लाखांपेक्षा जास्त अर्ज एकट्या बीड जिल्ह्यातले आहेत. बोगस पिकविम्याच्या परळी पॅटर्नवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील अनेक आरोप केले आहेत. ९६ महा ई-सेवा केंद्रांनी मोठ्या प्रमाणात बनावट अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्यावरती आता फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र कृषी विभागाचे दोषी अधिकारी आणि विमा कंपनी याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला १० लाख रुपयांचा दंड

RCB vs GT Final : पावसामुळं फायनल रद्द झाली तर कोण ठरणार IPL विजेता, जाणून घ्या नियम

Smoothening VS Keratin: केस खूप ड्राय आणि फ्रिझी झालेत? केसांसाठी कोणता ट्रीटमेंट फायदेशीर? जाणून घ्या

गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत आठ शेळ्या जळून खाक, शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

Dog Bark Safety: 'या' ४ वस्तू जवळ ठेवा, कुत्रा कधीच हल्ला करणार नाही

SCROLL FOR NEXT