Congress News SaamTv
Video

Congress News : मविआमध्ये कॉंग्रेसची नमती भूमिका, काही जागांवर घेणार माघार ?

MVA Seat Sharing News Update : ज्या १० ते १२ जागांवर महाविकास आघाडीमध्ये पेच आहे त्या जागांवर कॉंग्रेस माघार घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत आज अंतिम निर्णय होणार आहे.

Saam Tv

मविआमध्ये कॉंग्रेस काही जागांवर माघार घेण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. यात नाशिक, भायखळा आणि अन्य काही जागांवर कॉंग्रेस पक्ष माघार घेणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे. आज होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबरला कॉंग्रेसकडून या जागांवरील अर्ज माघारी देखील घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने मविआमध्ये काहीशी नमती भूमिका घेतलेली दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. त्यातच आता ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे गटाने देखील उमेदवार दिले आहेत, अशा ठिकाणी कॉंग्रेसने आता माघार घेण्याचं ठरवलं आहे. यात नाशिक आणि भायखळासह अजून काही जागांचा समावेश असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजेच ४ नोव्हेंबरला कॉंग्रेस या जागांवरून आपले अर्ज देखील मागे घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मविआमधील ज्या १० ते १२ जागांवर पेच आहे त्याठिकाणी बंडखोरी होणार नाही यासाठी कॉंग्रेसकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबाबत आजच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असून या जागा कोणत्या यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT