पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात युद्धसंघर्ष सुरू झाला होता. अमेरिकेने मध्यस्थी करत या युद्धाला विराम दिला असला तरी देखील अजूनही जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. हा मोठा तणाव असताना आता एक नवीन वृत्त समोर आले आहे. चीनच हेरगिरी करणारे जहाज भारताच्या समुद्री हद्दीत आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
चीनच्या जहाजांच्या या फ्लीटमध्ये एकूण चार जहाज आहे. यापैकी तीन जहाज अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोकळ्या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आहे. जहाजांची ही फ्लीट संशोधन करणारी असली तरी काहीतरी हेरगिरी करत असल्याची चर्चा सुरू आहे. या जहाजाचे नाव दा यांग यी हाओ असून सध्या मलाक्का समुद्रातून बंगालच्या उपसागरात प्रवेश करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.