विधानसभा निवडणुकीच्यावेळी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन वर्ष झाले अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली नसल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यावरूनच आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार तोफ डागली आहे. निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करू असे म्हणत होते.
आता सत्तेवर बसल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे शब्द बदलले आहेत. ते आता म्हणत आहे की दुष्काळ पडू द्या आपण कर्जमाफी करू. आता शेतकऱ्यांनी कर्जमाफी कर्जमाफी म्हणून काय खोदून मरावं आणि ते आम्ही सर्वांनी पहावं. आणि त्यानंतर कर्जमाफी करावी ही प्रवृत्ती रामराज्याची नसून रावणाची आहे, असे म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.