आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाच्या वतीने यंदा पालखी तळांचे विशेष सुशोभीकरण करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी सिमेंटचे रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाचा वारी सोहळा अधिक सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे.
पालखी तळांवर वारकऱ्यांना आरामदायक मुक्कामासाठी आवश्यक त्या सुविधा देण्यात आल्या आहेत.स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या सहकार्याने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.वारीचा अनुषंगाने करण्यात आलेली ही तयारी भक्तांच्या सेवेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, यामुळे वारकऱ्यांना वारीचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.