अमरावती विमानतळावर संध्याकाळी धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे मोठा अडथळा निर्माण झाला. मुंबईवरून अमरावतीला येणारे विमान अमरावती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच हवामान बिघडल्याने विमानाला थेट परत मुंबईला जावे लागले. या घटनेमुळे मुंबईवरून आलेल्या प्रवाशांना परतीच्या प्रवासातच परत जावे लागले, तर अमरावतीहून मुंबईला जाणारे प्रवासी विमानतळावर थांबून राहिले.
बेलोरा विमानतळावर रात्री उतरण्याची सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सलग उड्डाणांमध्ये होणाऱ्या अडथळ्यांमुळे अमरावती-मुंबई-अमरावती या हवाई सेवेला वारंवार समस्यांचा सामना करावा लागत असून प्रवाशांचा त्रास वाढत आहे. हवामानातील बदल आणि तांत्रिक सुविधांचा अभाव ही विमानसेवेपुढील मोठी अडचण ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.