लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मतदान केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मतदारांचे आभार मानले होते. उद्धव ठाकरेंनी आभार मानताना सर्व धर्मीयांचा उल्लेख केला. मात्र त्यात दलित आणि बौद्धांचा उल्लेख केला नाही, असा आरोप ट्वीटद्वारे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 'गरज सरो वैद्य मरो'चे उत्तम उदाहरण - उच्च वर्णीय हिंदूंनी भाजपाला मतदान केले आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. या निवडणुकीत दलीत, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी उबाठा शिवसेनेला आणि मविआला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलित, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता! दलित आणि बौद्धांनी आता शहाणे व्हा..असे ट्वीट करत आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंवर संताप व्यक्त केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.