आता याच मुद्द्यावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे. मुनगंटीवार यांनी गडचिरोलीतील धान्य भरडाईतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत, अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना लाच देण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप केला. त्यांनी विधानसभेत सांगितले की, लाच दिल्याशिवाय शेतकऱ्यांना धान्य भरडाईसाठी परवानगी दिली जात नाही, काहींचा तांदूळ उचलला जात नाही, तसेच काहींना लॉटही दिला जात नाही. जो पैसे देईल, त्याचाच तांदूळ स्वीकारला जातो, असा उघडपणे भ्रष्टाचार गडचिरोलीत सुरू आहे.
या गंभीर आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दखल घेत यासंदर्भात बैठक घेण्याचे आदेश दिले. त्यांनी सांगितले की, त्या अधिकाऱ्यांची सर्व माहिती आठ दिवसांत मागून घेतो आणि जे अधिकारी तेथे निगरगट्टे झाले आहे. त्यांना जी मस्ती आली आहे. त्यांची मस्ती उतरवतो आणि त्यांचा कायमचा बंदोबस्त करतो असा सज्जड दम अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.